रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
Indian Independence Day
नोव्हेंबर 23, 2021

भारताचा स्वातंत्र्य दिन - आपलेपण जपण्याचे स्वातंत्र्य

भारत एक राष्ट्र म्हणून 1947 मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्यप्राप्ती नंतर जगाच्या पटलावर आले. भारत जवळपास 200 वर्षांपर्यंत ब्रिटिश साम्राज्याच्या तावडीत होता आणि 15 ऑगस्ट, 1947 रोजी भारताला अधिकृतपणे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्व मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळविण्याची उदात्त भावना स्वातंत्र्य सैनिकांच्या मध्ये होती आणि कठोर संघर्षानंतर आपला देश स्वतंत्र झाला. आजही, 'आपलं असणं' ही भावना या देशाच्या तरुणांना दमनाच्या स्थितीत त्यांच्या हक्कांसाठी, मूल्यांसाठी लढण्यासाठी बळ प्रदान करते. सर्वसाधारणपणे स्वातंत्र्य दिनी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली जाते. भारतीय राष्ट्रध्वजाचा ध्वजारोहण समारंभ पार पडतो. त्यादिवशी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व दिमाखदार संचलन पार पडते. भारतातील प्रत्येक खासगी आणि सार्वजनिक इमारतीची दिमाखदार पद्धतीने सजावट केलेली असते. भारतीय राष्ट्रध्वजही डौलाने फडकत असतो. शाळांमध्ये संमेलनांचे आयोजन केले जाते. सर्व विद्यार्थी चित्रकला, गायन, निबंध-लेखन, फॅन्सी-ड्रेस, रांगोळी, पथनाट्य आणि इतर विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतात. अनेक कार्यालयांमध्ये या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या संकल्पनेवर आधारीत विविध उपक्रम आणि कार्यक्रमांची आखणी केली जाते. हे सानुकूल समारोह अद्याप पाहिले जात असताना आजकाल लोक सोशल मीडियाचा वापर करून त्यांचा उत्साह व्यक्त करतात. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकांना स्वातंत्र्य दिन फ्रेम आणि थीमचा वापर करून त्यांचे प्रोफाईल फोटो बदलण्याची सुविधा देतात. तसेच लोक त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो पोस्ट करतात, विशेषत: प्रसंगासाठी किंवा देशासाठी त्यांचे प्रेम व्यक्त करतात. त्या दिवसाचे उपक्रम आणि कार्यक्रमांना टॅग करण्यासाठी नेटवर अनेक हॅशटॅग वापरले जातात. केवळ स्वातंत्र्यदिन पोस्ट सोशल मीडियावर सर्वाधिक नसतात. अशा अनेक फोटो आणि मेसेजेस आहेत जे चॅटिंग प्लॅटफॉर्मवर फॉरवर्ड केले जातात, जे या विशेष दिवसाबद्दल आनंददायी शुभेच्छा देतात. परंतु जेव्हा तुम्ही हे मेसेज फॉरवर्ड करत असाल, तुमचे फोटो अपलोड करत असाल आणि तुमचे प्रोफाईल फोटो अपडेट करत असाल तेव्हा तुम्ही कशाप्रकारे काळजी घेत आहात? आजकाल सायबर गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसऱ्या बाजूला इंटरनेट युजर्सच्या संख्येतही वाढ दिसून येत आहे. हॅकर्स स्वातंत्र्य दिन सारख्या विशेष दिवसाचा फायदा उचलतात आणि सायबर-हल्ला सुरू करण्यासाठी सर्वात असुरक्षित लोकांना टार्गेट करतात. अशा गंभीर परिस्थितीत स्वत:ला कव्हर करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सायबर इन्श्युरन्स पॉलिसी मिळवणे. सायबर सिक्युरिटी इन्श्युरन्स हा एक युनिक इन्श्युरन्स प्लॅन आहे जो व्यक्तींना सायबर-हल्ल्याचा शिकार झाल्यास स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाईन केलेला आहे. या स्वातंत्र्य दिनी तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम सायबर इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करून ऑनलाईन जगात तुमच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला इन्श्युअर करा.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत