रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
General Insurance Penetration in India
नोव्हेंबर 23, 2021

भारतातील इन्श्युरन्स सेक्टर - टियर 3 आणि 4 शहरांमध्ये जनरल इन्श्युरन्स प्रसाराची गरज

इन्श्युरन्स व्यवसाय किंवा सामान्यपणे जनरल इन्श्युरन्स म्हणून ज्ञात असलेले सेक्टर भारतात मोठ्या प्रमाणात विस्तारीत होत आहे. सुमारे 8000 कोटी पासून सुरुवात केलेल्या या सेक्टरचा सन 2016-17 मध्ये सुमारे 120000 कोटी इतका विस्तार झाला आहे. एकूण आर्थिक विकासासह जनरल इन्श्युरन्स इंडस्ट्रीत नेहमीच वाढ झाली आहे. लाईफ इन्श्युरन्समध्ये पूर्णपणे सेल्स आधारित वितरण आहे, जेथे विक्रेते आवश्यकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, पण त्याउलट पी अँड सी मध्ये इन्श्युरन्सची गरज किंवा संधी यापूर्वीच अस्तित्वात आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही कार खरेदी केली असेल तर तुम्ही किमान थर्ड पार्टी इन्श्युरन्स असल्याशिवाय ती रोडवर चालवू शकणार नाही किंवा जर तुम्ही बँककडे लोनसाठी अप्लाय केले असेल तुमची मालमत्ता इन्श्युअर्ड असणे ही पूर्व-आवश्यकता आहे. परंतु भारतात जवळपास 30 जनरल इन्श्युरन्स कंपन्या आहेत (हेल्थ इन्श्युरन्स कंपन्यांसह). इतक्या सर्व कंपन्यांना आकाराने वाढण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी अशा पारंपारिक 'संधी' पर्याप्त नाहीत. मोटर नेहमीच जनरल इन्श्युरन्समध्ये बिझनेसचा प्रमुख प्रकार राहिलेला आहे आणि 1 अब्ज पेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या देशात, हेल्थ इन्श्युरन्स हा बिझनेसचा पुढील तर्कसंगत प्रकार होता. आमच्याकडे सर्व जीआय कंपन्या आहेत ज्या भारतात हेल्थ इन्श्युरन्सची विक्री करतात, ज्यात किमान 5 विशेष हेल्थ इन्श्युरन्स कंपन्यांचा (पाईपलाईनमध्ये आणखी काही आहेत) समावेश होतो. लॉजिस्टिक्स, उत्पादकता, तिकीट साईझ आणि सहज वितरण यांनी केवळ मेट्रो आणि टियर I शहरांमध्ये स्पर्धा करणाऱ्या कंपन्यांना हातभार लावला आहे. परंतु भारतात, आजही, 60% पेक्षा जास्त लोक टियर III आणि IV शहरे/गावांमध्ये किंवा त्याहून खाली राहतात. यामुळे एक मोठा कस्टमर बेस तयार होतो जो मोठ्या प्रमाणात वापरला गेला नाही. टियर III आणि IV शहरांमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने बहुतेक इन्श्युरर्सना प्रामुख्याने खालील आव्हानांचा सामना करावा लागतो:
  1. सर्वत्र युनिफॉर्म सर्व्हिसेस प्रदान करण्यासाठी किमान मनुष्यबळासह प्रत्यक्ष ऑफिस उघडण्याचा जास्तीचा खर्च
  2. मोठ्या शहरातून या शहरांपर्यंत पोहोच/कनेक्टिव्हिटी समस्या
  3. या भागात इन्श्युरन्सविषयी कमी जागरुकता आहे, त्यामुळे इन्श्युरन्सविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी अधिक प्रयत्न आणि संसाधनांची आवश्यकता आहे.
  4. कस्टमरच्या शंका आणि समस्यांचा सामना करण्यासाठी अनुभवी आणि प्रशिक्षित मनुष्यबळ (इन-हाऊस आणि वितरक नेटवर्क्स), कारण पॉलिसीच्या अटी व शर्ती, क्लॉज, क्लेम सेटलमेंट प्रोसेस इत्यादींच्या बाबतीत इन्श्युरन्स अत्यंत तांत्रिक असू शकते.
  5. किंमतीवरील आव्हाने, कारण क्लेम साईझ आणि फ्रिक्वेन्सीवरील (विशेषत: हेल्थ इन्श्युरन्समध्ये) उपलब्ध डाटा अपुरा आहे.
त्यामुळे भारतात इन्श्युरन्सचा विस्तार अत्यंत कमी आहे. तथापि, जर आपण टियर III आणि IV शहरांवर लक्ष केंद्रित केले नाही तर इन्श्युरन्स बिझनेस वाढवणे शक्य नाही. एफएमसीजी, फार्मा आणि टेलिकॉम क्षेत्रातील काही इंडस्ट्रीजनी तेथे चांगली कामगिरी केली आहे. परंतु ते यशस्वी झाले आहे कारण ते या क्षेत्रातील स्थानिक लोकांच्या गरजेनुसार त्यांची प्रॉडक्ट ऑफरिंग आणि वितरण पद्धती ॲडजस्ट करू शकले. यातील काही ॲडजस्टमेंट मध्ये परवडण्याच्या क्षमतेतील इनोव्हेशन (गुणवत्तेशी तडजोड न करता), मासिक पॅक्सच्या बदल्यात दैनंदिन बजेट, व्यापक वितरण नेटवर्कद्वारे सोपी उपलब्धता इ. समाविष्ट आहे. या गोष्टींनी या क्षेत्रात त्यांच्या यशात हातभार लावला आहे. जरी या इंडस्ट्रीज पेक्षा इन्श्युरन्स खूपच वेगळे असले तरीही, इन्श्युरन्सचा विस्तार करण्यासाठी आपण अद्याप काही गोष्टी शिकू शकतो. इन्श्युरन्स मधील सर्वात मोठे आव्हान म्हणजे कस्टमरसाठी त्वरित समाधान उपलब्ध नसते. सरतेशेवटी, हे कोणतीही दुर्घटना झाल्यास नुकसान पुनर्स्थापित करण्याचे किंवा भरपाई करण्याचे वचन असते. आपल्यापैकी बहुतांश, दैनंदिन आधारावर सर्वात वाईट दुर्घटना पाहिल्यानंतरही, ती आपल्यासोबत घडू शकत नाही असा विचार करतात. इन्श्युरर्सना ही मानसिकता बदलण्यासाठी आणि या क्षेत्रात एफएमसीजी आणि टेलिकॉम कंपन्यांनी साध्य केलेल्या यशाचे प्रकार प्राप्त करण्यासाठी थोडे अधिक प्रयत्न आणि कठोर परिश्रम करावे लागतील. टियर III आणि IV शहरांसाठी रणनीती तयार करताना जनरल इन्श्युररने विचारात घ्यावी अशी काही माहिती आणि सूचना येथे दिल्या आहेत:
  1.   प्रत्यक्ष उपस्थिती असल्याशिवाय स्वयंपूर्ण (म्हणजेच पॉलिसी जारी करणे, तंत्रज्ञानाच्या मदतीने त्वरित क्लेमचे सेटलमेंट) इकोसिस्टीम तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर करा
  2. वितरण रणनीती मेट्रो आणि टियर I शहरांच्या समान असू शकत नाही. नियमित परंतु प्रति महिना कमी सेल्स असलेले मोठ्या प्रमाणात एजंट (कदाचित फूल-टायमर्स नसतील) हे याकडे जाण्याचा एक मार्ग आहे.
  3. कव्हरेज, वैशिष्ट्ये, परवडणारी क्षमता आणि पॉलिसी कालावधी (बहुतांश पॉलिसी एका वर्षासाठी असतात) इत्यादींच्या संदर्भात इनोव्हेशन आणि कस्टमायझेशनची आवश्यकता.
  4. जागरूकता ही संपूर्ण इंडस्ट्रीची मोठी जबाबदारी आहे, जनरल इन्श्युरर्सनी स्मार्ट जाहिरातीसाठी अधिक संसाधनांना एकत्रित करणे आवश्यक आहे (मीडिया टीव्हीसी, वृत्तपत्र, सोशल मीडिया इ. चा नाविन्यपूर्ण वापर).
  5. सीएससी, आयएमएफ, पीओएस आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसारख्या नवीन वितरण संधी इन्श्युरन्सचे प्रमाण वाढविण्यास मदत करू शकतात.

सारांश

बजाज आलियान्झ मार्केट म्हणून केवळ टियर 3 आणि 4 शहरांमध्ये जनरल इन्श्युरन्स विस्ताराची गरज म्हणून पाहत नाही तर याठिकाणी राहणार्‍या लोकांना कमाईचे साधन देखील उपलब्ध करून देण्याचे ध्येय बाळगते. सध्या 800 पेक्षा जास्त कार्यरत व्हीएसओसह आम्ही 1000 पेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार प्रदान केला आहे आणि मध्यस्थांचे विस्तृत नेटवर्क अप्रत्यक्षपणे तयार केले आहे. व्हर्च्युअल ऑफिस उपक्रम, अशा प्रकारे, केवळ या भागातील कस्टमर्सना स्वत:ला सुरक्षित ठेवण्यास सक्षम करत नाही, तर या भागातील समुदायाला त्यांचे गाव न सोडता प्रतिष्ठित ब्रँडसह काम करण्याची संधी देखील तयार केली आहे. योगदान: आदित्य शर्मा, सीनिअर व्हाईस प्रेसिडंट आणि नॅशनल हेड - स्ट्रॅटेजिक इनिशिटिव्ह, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कं. लि

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत